Three drown in Ganga river गंगा नदीत बोट उलटून तिघे बुडाले….४ जण बेपत्ता

बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील गंगा नदीपात्रात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात गंगा नदीत १४ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने किमान तीन जणांचा मृत्यू झाला असून चार जण बेपत्ता आहेत. ही घटना पहाटे ५.४५ च्या सुमारास घडली आणि बचाव पथकांनी सात प्रवाशांना वाचवण्यात आल्याचे सांगितले, तर बेपत्ता लोकांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
मृतांमध्ये महिलांचा समावेश
“या घटनेत आतापर्यंत तीन मृत्यू झाले असून चार जण अद्याप बेपत्ता आहेत,” ही माहिती मोहिउद्दीन नगरचे सर्कल ऑफिसर ब्रिजेश कुमार द्विवेदी यांनी दिली. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पाटणा जिल्ह्यातील बरह पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मासूमगंज बिंद टोली येथील रहिवासी असलेले १४ प्रवासी, शेतीच्या कामासाठी मोहिउद्दीन नगरमधील सुलतानपूर दियारा येथे जाण्यासाठी गंगा ओलांडत होते आणि परवलच्या शेतातून भाजीपाला घेऊन उमानाथ घाटाकडे परत येत असताना हा अपघात घडला.
पाटणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस. एम. थियागराजन यांनी सांगितले की, जोरदार वाऱ्यामुळे १४ जणांना घेऊन जाणारी बोट उलटली असून, समस्तीपूर आणि पाटणा जिल्हा प्रशासनाची पथके संयुक्तपणे बचावकार्य करत आहेत.
मोटरमध्ये बिघाड
“स्थानिक डायव्हर्स, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांच्या संयुक्त प्रयत्नांतून आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उर्वरित चार बेपत्ता व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे,” असे बरहचे एसडीपीओ-१ राम कृष्ण यांनी सांगितले. त्यांनी माहिती दिली की, ती एक लहान डिंगी होती, जिचे मोटरमध्ये बिघाड होऊन ते व्यवस्थित काम करणे थांबले होते, त्यानंतर जोरदार वाऱ्यामुळे ती उलटली.
Source link



