Uncategorized

Kagal News | कागलमध्ये दुर्दैवी घटना; राहत्या घराची भिंत अंगावर कोसळून ३८ वर्षीय महिलेचा मृत्यू

कागल -कागल शहरातील लोहार गल्ली परिसरात बुधवारी रात्री राहत्या घराची भिंत अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. उर्मिला उदय कुलकर्णी (वय ३८) असे मृत महिलेचे नाव आहे.

ही घटना बुधवारी रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. घरातील भिंत अचानक कोसळून उर्मिला कुलकर्णी यांच्या अंगावर पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.

त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले . मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेमुळे कागल शहरात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​