Uncategorized

Man Killed 2 Kids पत्नी सोडून गेल्यामुळे त्याने आपल्या दोन्ही मुलांसह स्वत:लाही संपवलं…

पत्नी सोडून गेल्यामुळे व्यथित झालेल्या एका व्यक्तीने आपल्या दोन्ही मुलांना विजेचा धक्का देऊन स्वत:लाही संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूच्या तुतीकुडी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

पुदुकोट्टाईजवळील सवेरियारपुरम येथे एका वडिलांनी आपल्या दोन निष्पाप मुलांना विजेचा धक्का देऊन ठार मारले आणि त्यानंतर त्याच तारेने स्वतःलाही विजेचा झटका देऊन आत्महत्या केली. 

या प्रकरणात, पोलिसांनी सांगितले की, पत्नीने सोडून दिल्यामुळे आपल्या मुलांची हत्या करणारी व्यक्ती खूप अस्वस्थ आणि निराश होती, त्यानंतर त्याने असे पाऊल उचलले.

Taj Hotel threat “दाऊदने बॉम्ब ठेवला आहे” ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीने सुरक्षा यंत्रणांची भंबेरी

संपूर्ण प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची ओळख ४० वर्षीय मेरी मायकल अशी पटली असून तो पूर्वी ट्रक चालक म्हणून काम करत होता. मायकलला १४ वर्षीय मेरी निरोशा आणि १२ वर्षीय मेरी केनिस्टन अशी दोन अपत्ये होती. दोन्ही मुले एका खाजगी शाळेत शिकत होती.

पोलिसांनी सांगितले की, सुमारे सहा महिन्यांपूर्वी मायकलची पत्नी त्याला आणि मुलांना सोडून दुसऱ्या पुरुषासोबत राहू लागली. यामुळे मायकल पूर्णपणे खचून गेला होता. त्याने ट्रक चालवण्याचे कामही कमी केले होते आणि अधूनमधून रंगकाम करायला सुरुवात केली होती.

गुन्हा कसा घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री मायकल मुलांसाठी बाजारातून जेवण घेऊन आला. त्यांना खाऊ घातल्यानंतर त्याने त्यांना झोपायला पाठवले. मुले झोपल्यावर मायकलने त्यांच्या शरीराला विजेच्या तारा बांधल्या आणि त्यांना थेट वीज पुरवठ्याशी जोडले. मुलांचा मृत्यू झाल्यानंतर, त्याने त्याच तारेने स्वतःचे जीवन संपवले.

प्रकरण असे उघडकीस आले

मिळालेल्या माहितीनुसार मायकलचे ७५ वर्षीय वडील, अँथनी मुथू, हे देखील त्याच घरात राहत होते आणि त्या रात्री ते खोलीबाहेर झोपले होते. शनिवार दुपारपर्यंत दरवाजा बंद राहिल्याने आणि आत कोणतीही हालचाल न झाल्याने, मायकलच्या वृद्ध वडिलांना संशय आला. त्यांनी तात्काळ शेजाऱ्यांना बोलावले आणि पुदुकोट्टाई पोलिसांना माहिती दिली.

जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दरवाजा तोडला, तेव्हा त्यांना आत एका खाटेवर विजेच्या तारांमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत तीन पुरुषांचे मृतदेह आढळले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी तुतीकोडी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​