श्री बाळगोपाळ मंडळ आचराकडून 120 रोपांचे वाटप

आचरा : प्रतिनिधी
श्रीबाळगोपाळ मंडळ आचरा वरचीवाडीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने 120 सुपारी आणि जास्वंदीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच वृक्षारोपणही करण्यात आले. बालगोपाळ मंडळाचा अमृतमहोत्सवी वर्ष विविध उपक्रमांनी साजरे केले जात आहे. या निमित्त पर्यावरण संवर्धनासाठी मंडळातर्फे 120 सुपारी आणि जास्वंदीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच मंडळाचे जेष्ठ सभासद विष्णू लाड यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष मंदार आचरेकर,उपाध्यक्ष महेंद्र आचरेकर,सचिव विलास आचरेकर,खजिनदार पंकज आचरेकर.तसेच वैभवशाली पतसंस्था संचालक वामन आचरेकर मंडळाचे महेश शेट्ये, संदीप चव्हाण,अक्षय लाड, सौ मनाली आचरेकर जेष्ठ सल्लागार शिवराम शेट्ये,रामदास आचरेकर,श्रीकृष्ण लाड,विजय लाड,संजय आचरेकर,शिवराम आचरेकर,ओमकार आचरेकर,मंगेश आचरेकर,संतोष आचरेकर,प्रथमेश शेट्ये,प्रकाश लाड,विशाल आचरेकर,दीपक आचरेकर,मनस्वी आचरेकर,मंगल घाडी,निशिगंधा भिरवंडेकर,प्रेमा आचरेकर,निकिता आचरेकर,विद्या जाधव,प्रिया आचरेकर,दीपा लाड,विभावरी लाड,रुचिता आचरेकर,उर्मिला लाड,ममता आचरेकर, शैलेश शेट्ये,नितीन आचरेकर,योगेश बागवे,वैभव कोदे, ओमकार भिरवंडेकर आदी उपस्थित होते.
Source link



