Uncategorized

परीक्षा घेणाऱ्यांचीच परीक्षा

हे असे होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वाढती लोकसंख्या व वाढणाऱ्या शैक्षणिक-रोजगार संधी व त्यामुळे वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर प्रवेश पात्रता परीक्षेचे परिणाम क्यापक स्वरुपात व विविध संदर्भात होताना दिसतात. त्यातही पण विद्यार्थी-उमेदवारांच्या वयोगटाचा विचार करता या स्पर्धा सर्वस्वी युवा वर्गासाठी असल्याने त्यामध्ये युवकांचाच सहभाग प्रयत्नपूर्वक व मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे अशा परीक्षांचे आयोजन, नियोजन व व्यवस्थापन अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते. याची मुख्य जबाबदारी अर्थातच संबंधित परीक्षेनुसार राज्य वा केंद्र सरकारकडे असते.

विविध विषय अथवा क्षेत्रांमध्ये प्रवेश अथवा निवड यासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षांकडे पाहिले जाते. त्यानंतर क्रम येतो तो समूह चर्चा, वैयक्तिक मुलाखत इ. चा. निवड प्रकारात ही पद्धत तशी सर्वमान्य ठरलेली. काही ठिकाणी मूळ निवड परीक्षेला शारीरिक क्षमता चाचणी व वैद्यकीय तपासणीची जोड दिली जाते. यापैकी निवड परीक्षेसाठी नव्याने करण्यात आलेल्या प्रशासनिक प्रयोगानुसार विशिष्ट पदांसाठीच्या उमेदवारांसाठी निवड करताना मुख्य भर हा संबंधित उमेदवारांच्या स्पर्धा परीक्षेतील गुणांकांवर देऊन त्याआधारे व प्रत्यक्ष मुलाखतीविनाच उमेदवारांची निवड पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात झाली व या नव्या प्रयोगाला अपेक्षित यश पण प्राप्त झाले. यामुळे प्रामुख्याने लक्षात आलेला मुद्दा म्हणजे विविध स्पर्धा परीक्षेतून उमेदवारांची निवड करताना प्रसंगी उमेदवारांची मुलाखत बाजुला ठेवली तरी यासाठीच्या स्पर्धा परीक्षेला मात्र पर्याय नसतो. त्यामुळेच स्पर्धा परीक्षेचे महत्त्व प्रामुख्याने लक्षात येते. हीच बाब प्रामुख्याने ‘नीट’ प्रवेश परीक्षेच्या निमित्ताने स्पष्ट झाली व जणू स्पर्धा घेणाऱ्यांची परीक्षा घेण्याचा व अशा प्रकारे राष्ट्रीय स्वरुपातील व देश पातळीवरील स्पर्धा घेणारे परिक्षक ते संबंधित पुढारी या साऱ्यांनीच परीक्षा व प्रसंगी फेरपरीक्षा देण्याचा प्रयोग आणि प्रकार पण आपण नव्यानेच अनुभवला व त्यातून विद्यार्थ्यांपासून शिक्षणांपर्यंत सर्वांनाच जणू धडा पण मिळाला.

‘नीट’ परीक्षा व आंदोलनाच्या निमित्ताने प्रामुख्याने स्पष्ट झालेली बाब म्हणजे या आणि अशा महत्त्वपूर्ण निवड स्पर्धा परीक्षांचा विचार, तयारी परीक्षा देणे व त्यांचा निकाल या साऱ्यांचा परिणाम केवळ स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थीच नव्हे तर त्यांचे संपूर्ण कुटुंबीय, नातेवाईक या साऱ्यांवर होत असतात. याशिवाय या स्पर्धा निवड परीक्षांची पूर्वतयारी करवून घेणारे व त्यानुषंगाने काम करणारे मार्गदर्शक इ. ची मोठी संख्या असते ती वेगळीच. संबंधितांची संख्या प्रसंगी फार मोठी ठरू शकते. या साऱ्यांनी आपल्या पैशांपासून परिश्रमापर्यंत विविध पैलू आपला पाल्य वा नातेवाईकाच्या परीक्षेपोटी लावले असतात. याचाच प्रत्यय काही ठिकाणी व मोठ्या प्रमाणात आपल्याकडे नुकताच आला. भौगोलिक आकार व विस्तार आणि लोकसंख्या इ. संदर्भात मोठ्या आकाराच्या देशात विविध प्रकारच्या व विविध स्तरांवर घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा पात्रता परीक्षा मोठ्या प्रमाणात व विविध प्रकारे परिणामकारक ठरतात हे लक्षात घेणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांच्या निमित्ताने व त्या माध्यमातून केवळ स्पर्धक विद्यार्थीच नव्हे तर त्याचे कुटुंब, नातेवाईक व परीक्षा प्रक्रियेशी प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे सहभागी सर्व घटकांचा त्यामध्ये सहभाग होत असतो. इंजिनिअरिंग व तंत्रज्ञान विषयातील नामवंत संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी, इच्छुक विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करून देण्यासाठी मोठा लौकिक कमावणाऱ्या राजस्थानच्या कोटा शहराची आर्थिक-व्यावसायिक व सामाजिक व्यवस्था ही स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रक्रियेवर अवलंबून असते ही बाब सर्वदूर माहिती आहे. याचे कारण कोटा मुक्कामी देशातील सर्व भागातून विद्यार्थी इंजिनिअरिंग व अभियांत्रिकीच्या प्रवेश तयारीसाठी दीर्घकालीन मुक्कामाने येतात व त्यांना शैक्षणिक मार्गदर्शनाशिवाय त्यांचे निवास, भोजन व अनुषंगिक सोयी सुविधा याची गरज आज कोटा शहर व तेथील रहिवासी भागवत असतात.

हे असे होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वाढती लोकसंख्या व वाढणाऱ्या शैक्षणिक-रोजगार संधी व त्यामुळे वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर प्रवेश पात्रता परीक्षेचे परिणाम क्यापक स्वरुपात व विविध संदर्भात होताना दिसतात. त्यातही पण विद्यार्थी-उमेदवारांच्या वयोगटाचा विचार करता या स्पर्धा सर्वस्वी युवा वर्गासाठी असल्याने त्यामध्ये युवकांचाच सहभाग प्रयत्नपूर्वक व मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे अशा परीक्षांचे आयोजन, नियोजन व व्यवस्थापन अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते. याची मुख्य जबाबदारी अर्थातच संबंधित परीक्षेनुसार राज्य वा केंद्र सरकारकडे असल्याने त्यामध्ये काहीही गडबड झाल्यास त्याचे त्वरित व थेट परिणाम राजकारणी व शासनकर्त्यांवर होतात, याचे प्रत्यंतर नव्यानेच दिल्लीच्या  जंतर-मंतर पासून रांची-झारखंडपर्यंत आलेले आहे. देशाच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने जागतिक संदर्भात व फार मोठ्या संख्येत व प्रमाणावर स्पर्धा परीक्षा घेण्याचे मोठे व जोखमीचे काम भारताशिवाय चीनमध्ये नेहमीच करावे लागते. त्यामुळे यासंदर्भात या उभय देशांची तुलना स्वाभाविकपणे व अपरिहार्यपणे केली जाते. अशी तुलना भारत आणि चीनमध्ये यावर्षी घेण्यात आलेल्या मोठ्या स्वरुपातील स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात केल्यास काही महत्त्वपूर्ण बाबी स्पष्ट होतात. नीट निवड पद्धतीतच पेपरफुटीचा मोठा घोटाळा होऊन आपल्याला फेरपरीक्षेच्या दिव्याला सामोरे जावे लागले. या भीतीयुक्त दहशतीमुळे सुमारे 25 विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा दुर्देवी मार्ग स्वीकारला तर या प्रश्नाचे वास्तव व भीषणता वेळेत टिपून सर्वच विरोधी पक्षांनी युवकांना हाताशी धरून राजकीय आंदोलन करण्याचे राजकारण सुरु केले.

आपल्याकडील ‘नीट’ परीक्षेची यावेळची प्रक्रिया सुरु असतानाच चीनमधील अशाच प्रकारची ‘गुक्’ ही प्रवेश पात्रता परीक्षा घेतली जात होती. दरवर्षी जूनमध्ये घेण्यात येणारी ही प्रवेश पात्रता परीक्षा जागतिक स्तरावरील सर्वात मोठी व सर्वाधिक संख्येसह घेतली जाणारी पात्रता परीक्षा म्हणून मान्यताप्राप्त आहे. यावर्षी या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या होती 13.35 दशलक्ष. प्रस्थापित पद्धतीनुसार चीनमधील ‘गुक्’ ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर संचालित केली जाते. या परीक्षा पद्धतीवर तेथील केंद्रिय शिक्षण विभागाचे नियंत्रण असले तरी देशांतर्गत सर्वच प्रशासकीय यंत्रणा व कर्मचारी ‘गुक्’ परीक्षेवरच प्राधान्याने व संपूर्णपणे लक्ष केंद्रित करीत असतात. या साऱ्यांचा एकच उद्देश असतो व तो म्हणजे दरवर्षी निश्चित तारखेला ठराविक वेळी व आपापल्या ठिकाणी लाखोंच्या संख्येतील विद्यार्थी शालांत परीक्षेनंतरच्या अभ्यासक्रमासाठीची ही परीक्षा देतील व त्यांच्या भविष्याला आकार मिळेल. अनेक वर्षांपासून चीनमध्ये या परीक्षेचे नियोजन, आयोजन चोख पद्धतीने होत असते. चीनमधील या परीक्षेच्या नियोजन व त्याच्या अंमलबजावणीसाठी काटेकोर काळजी घेतली जाते. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे जतन व हाताळणी मोठ्या शासकीय गोपनीय कागदपत्र वा दस्तावेजासारखी केली जाते. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची वाहतूक करताना जीपीएस युक्त वाहनांचाच उपयोग केला जातो व या वाहनांना संपूर्णपणे पोलिसांचे संरक्षण दिले जाते.

प्रत्यक्ष परीक्षा कालावधीत व परीक्षा केंद्रांवर सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाते. परीक्षा केंद्र परिसरात संपूर्ण सुरक्षा व्यवस्था प्रदान करतानाच त्या क्षेत्र परिसरात मोबाईल वापरावर प्रतिबंधासह मोबाईल जॅमर्सचा वापर केला जातो. याशिवाय समाज माध्यमांद्वारे गैरवापर न होण्याची काळजी पण संपूर्णपणे घेतली जाते. यावर्षीच्या प्रवेश पात्रता परीक्षेत तर चीनमधील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी परीक्षेचे महत्त्व कायमच नव्हे तर भक्कम रहावे यासाठी स्वेच्छेने पुढाकार घेतला होता.

दत्तात्रय आंबुलकर


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​