Uttarakhand Bridge Collapsed | उत्तराखंडमध्ये १६ कोटींचा पूल कोसळला अन् चारधाम यात्रा झाली स्थगित

मुसळधार पावसामुळे १६ कोटी खर्चून बांधलेला उत्तराखंडमधला महत्त्वाचा पूल कोसळल्याने मंगळवारी रस्ते वाहतूक आणि तीर्थयात्रा दोन्ही विस्कळीत झाल्या, तसेच डेहराडून-पाँटा साहिब महामार्गावरील नव्याने बांधलेल्या पुलाचा काही भाग कोसळला आणि चार धाम यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली.
मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे यात्रा मार्गाचे अनेक टप्पे बंद झाल्याने, प्रवाशांची सुरक्षा हे यात्रा थांबवण्याचे प्रमुख कारण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, असे वृत्तसंस्था एएनआयने म्हटले आहे.
मुसळधार पावसात पूल कोसळला
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रेम नगर आणि नंदा की चौकी दरम्यानचा बाधित पूल कोसळला, त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेनंतर लगेचच दुरुस्तीचे काम सुरू झाले असून, अधिकाऱ्यांनी रस्ता पुन्हा सुरू करण्याला प्राधान्य दिले आहे.
हा मार्ग काही तासांतच कार्यान्वित होण्याची शक्यता आहे, अशी माहिती डेहराडूनचे जिल्हाधिकारी आशिष चौहान यांनी एएनआयला दिली.
“पुढील तीन ते चार तासांत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जात आहे. पुलाची संरचनात्मक रचना पूर्णपणे सुरक्षित आहे. या संदर्भात पुढील योग्य कारवाई नंतर केली जाईल, परंतु सध्या रस्ता खुला करणे हे आमचे प्राधान्य आहे,” असे चौहान म्हणाले.
चार धाम यात्रा स्थगित
दरम्यान उत्तराखंडमध्ये पावसाचे प्रमाण पाहता, मंगळवार आणि बुधवारची चार धाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे यात्रेच्या मार्गावरील अनेक भागांवर परिणाम झाल्याने हा निर्णय घेण्यात आला, असे गढवाल विभागीय आयुक्तांनी सांगितले.
VIDEO | Dehradun, Uttarakhand: Heavy rains continue to batter the city, schools shut. Traffic halted after Tons River bridge road caves-in.#DehradunRains #UttarakhandNews
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/S79lGkuZtI
— Press Trust of India (@PTI_News) July 28, 2026
दरम्यान सततच्या पावसामुळे मुनकटिया भागातील डोंगरावरून दगड आणि ढिगारे कोसळल्याने केदारनाथ महामार्गावरही परिणाम झाला आहे. ढिगारे हटवण्यासाठी अवजड यंत्रसामग्री तैनात करून युद्धपातळीवर रस्ता साफ करण्याचे काम सुरू आहे. यात्रेकरूंची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित केले जात असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
दरड कोसळण्याचा धोका अन् अधिकारी सज्ज
अधिकाऱ्यांनी सांगितले की, यात्रा नियंत्रण कक्ष परिस्थितीवर सतत लक्षअसून, समन्वय आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि इतर सुरक्षा यंत्रणांना नियमित घोषणा केल्या जात आहेत.
रुद्रप्रयागचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (डीडीएमओ) नंदन सिंग राजवार यांनी सांगितले की, मार्गावर हवामानामुळे आव्हाने निर्माण होत आहेत.
रस्त्याने प्रवास करण्याच्या मार्गात अनेक ठिकाणी अडथळे येण्याची शक्यता असून, आताही मुनकटिया येथे रस्ता बंद झाला होता, जो तात्काळ खुला करण्यात आला, परंतु तेथे धोका निर्माण झाला आहे. दगड कोसळण्याची सतत भीती असल्याने, सुरक्षेच्या दृष्टीने लोकांना रस्ता ओलांडायला लावला जात आहे. या संदर्भात संबंधित क्षेत्र अधिकारी आणि बचाव पथके संपूर्ण मार्गावर सतत देखरेख ठेवत असून, लोकांना सुरक्षित ठिकाणी थांबण्यासही सांगितले जात



