Uncategorized

काश्मीरमध्ये ग्रामरक्षक दल

पाच जिह्यांतील ग्रामस्थांची सैनिकांसोबत 12 तास सेवा

वृत्तसंस्था/ श्रीनगर

ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांनी गावपातळीवरील सुरक्षा यंत्रणा लक्षणीयरीत्या मजबूत केली आहे. गेल्या वर्षभरात पाच जिह्यांमध्ये 1,500 हून अधिक ग्रामरक्षकांना (व्हीडीजी) प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये शस्त्र हाताळणी, सामरिक हालचाल, निगराणी आणि आपत्कालीन प्रतिसाद यांचा समावेश आहे. आता .303 रायफल्सच्या जागी एसएलआर, बुलेटप्रूफ जॅकेट्स आणि वायरलेस कम्युनिकेशन सेट्स दिले जात आहेत. हे ग्रामरक्षक सीमावर्ती भागात सैनिकांसोबत 12-12 तास सेवा बजावत आहेत. गेल्या एका वर्षात घुसखोरीचे अनेक प्रयत्न झाले, परंतु व्हीडीजी रक्षकांनी वेळेवर लष्कर आणि पोलिसांना सतर्क केले. गावात कोणी अनोळखी व्यक्ती आल्यास, लोक त्याला लगेच ओळखतात आणि त्याच्या हालचालींची माहिती देतात. रात्रीच्या वेळी सुरक्षा दलांसोबत संयुक्त गस्तही घातली जाते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​